श्री संजीवनी समाध्या विषयी माहिती
- Get link
- X
- Other Apps
नवनाथांच्या समाधी ठिकाण
श्री संजीवनी समाध्या विषयी माहिती
१) मच्छिंद्रनाथ समाधी:
अहमदनगर- पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे. तेथुन तीन कि.मी अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरून सुध्दा रस्ता आहे.
२) जालिंदरनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी - पाटोदा - बीड या रोडवरून रायमोह गावात उतरणे. तेथुन ५ कि. मी. अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिन्ही मार्गेसुद्धा रस्ता आहे.
३) कानिफनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी रोड किंवा बीड - पाथर्डी - नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे व तेथुन दक्षिणेला ३ कि. मी. अंतरावर कानिफनाथ गड किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे. आसपासचा परीसर निसर्गरम्य आहे.
४) भर्तृहरीनाथ समाधी:
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे. तेथे भर्तृहरीनाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. येथे नागपंचमील यात्रा भरते.
१) मच्छिंद्रनाथ समाधी:
अहमदनगर- पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे. तेथुन तीन कि.मी अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरून सुध्दा रस्ता आहे.
२) जालिंदरनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी - पाटोदा - बीड या रोडवरून रायमोह गावात उतरणे. तेथुन ५ कि. मी. अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिन्ही मार्गेसुद्धा रस्ता आहे.
३) कानिफनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी रोड किंवा बीड - पाथर्डी - नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे व तेथुन दक्षिणेला ३ कि. मी. अंतरावर कानिफनाथ गड किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे. आसपासचा परीसर निसर्गरम्य आहे.
४) भर्तृहरीनाथ समाधी:
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे. तेथे भर्तृहरीनाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. येथे नागपंचमील यात्रा भरते.
५) रेवणनाथ समाधी:
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटे गाव, यालाच रेवणसिद्ध असेही म्हणतात. येथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत. रेवणनाथांची दोन प्राचीन मंदिरे आहेत. दर गुरूवारी आणि अमावस्येला भरपुर गर्दी असते.
६) वटसिद्ध नागनाथ समाधी:
हैद्राबाद - परळी रेल्वे महामार्गावर हे तीर्थक्षेत्र येते. लातुर जिल्ह्यापासुन २५ कि. मी. अंतरावर चाकुर तालुक्यात वडवळ हे गांव आहे. येथे वटसिद्ध नागनाथांची संजिवन समाधी आहे. येथे फार जुन्या पद्धतीचे मंदिर आहे.
७) गहिनीनाथ समाधी:
जालिंदरनाथ येवलेवाडीहून सरळ रस्त्याने डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गेकुसळंब मार्गेचांचोलीला जावे. किंवा बीड - पिंपळवडी - कुसळंब मार्गे चिंचोली, किंवा जामखेडहून चिंचोलीला जावे. येथे गहिनीनाथांचे भव्य असे प्राचीन समाधी मंदिर आहे.
८) गोरक्षनाथ समाधी:
सौराष्ट्रात काठेवाडी प्रातांत जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहेत. राजकोटहून जुनागड अंदाजे १०० कि. मी. अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम प्रभासपाटन तीर्थरूप (सोरटी सोमनाथ) जाता येते. गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मुर्ती आहे. नेपाळ प्रांतात गुरू गोरखनाथ बसलेले आहेत. म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गुरखा म्हणतात. महाराष्ट्रामधे नगर तालुक्यात डोंगरगण या ठिकाणीही मंदिर आहे.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment